साहित्य: २ प्लेट शिजवलेला भात, १चमचा उडीद डाळ, १ चमचा चणाडाळ , १ चमचा लालतिखट , १/२ चमचा हळद,४ते५ वाळलेली लाल मिरची, १चमचा जिरेमोहरी, १/२ वाटी चिंचेचा कोळ,कडीपत्ता, कोथिंबीर, आवडीनुसार मीठ व शेंगदाने, २ते३चमचा ,तेल.
कृती: सर्व प्रथम गॅसवर कढईत तेल टाकावे .तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरेमोहरी नंतर उडीद व चनाडाळ, शेंगदाणे भाजून घ्यावी.मग कडीपत्ता ,लाल मिरची (सुकी) घालून गॅस कमी करून त्यात लालतिखट व हळद, चिंचेचा कोळ घालून २ते३चमचा पाणी घालून ४ते५ मिनिट परतून घेऊन नंतर त्यामध्ये भात व चविनुसार मीठ कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि झाकण ठेवून एक वाफ काढावी .घरच्या घरी आंध्रप्रदेशचा भात तयार त्यासाठी आंध्रात जायची गरज नाही बर का!
टिप्स: यासाठी रात्रीचा शिळा भात असेल तर उत्तमच तुमचा आंबट भात पटकन तयार होईल.
0 comments:
Post a Comment